Shikrapur Police Station
शिक्रापूर : घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे हरिभाऊ रघुनाथ गायकवाड (रा. तळेगाव-ढमढेरे, ता.शिरूर) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांनी व्यवसायासाठी २०१८ मध्ये शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीच्या शाखेकडे पाच लाख रुपयांची कर्ज मागणी केली. शिक्रापूर शाखेतील सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील यांनी गायकवाड यांचेशी चर्चा करून ‘फायनान्स करू, त्यासाठी गहाण म्हणून घर, शेती जे काही असेल ते द्यावे लागेल.’ असे सांगितले होते. यानंतर गायकवाड यांनी राहत्या घराची सर्व कागदपत्रे देत महिंद्रा फायनान्सच्या नावाने घराचे गहाणखत केले. पुढील काळात महिंद्रा फायनान्स कंपनीने काही हप्ते भरण्यास सांगितल्यावरून त्यांनी काही हप्तेही भरले. मात्र, त्यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यास कंपनी टाळू लागली. या प्रकारामुळे गायकवाड हतबल झाले होते. गायकवाड यांनी महिंद्रा फायनान्सचे पुणे येथील कार्यालय गाठले. पुणे कार्यालयात त्यांना ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कर्जाचा धनादेश आम्ही देणार नाही,’ असे सांगितले.
दरम्यान, कर्ज राहू दे ‘गहाणखत तरी रद्द करा,’ असे गायकवाड यांनी सांगितले. त्यावर ‘अरेरावी आणि तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही कर्जधनादेश देणार नाही. गहाणखतही बदलणार नाही’, असे सांगितले. या सर्व प्रकाराला कंटाळून हरिभाऊ गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे. हरिभाऊ गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…
शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…