आरोग्य

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम

ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते २०१८ पर्यंत २० वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या १५ टक्के लोकांनी नियमित रूपाने नाश्ता करणं सोडलं. सकाळची धावपळ, उपवास किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न यामुळे हे चलन वाढलं. तर काही लोकांना दिवसाची सुरूवात जेवणाने करायची नसते.

नाश्ता न करण्याचे नुकसान

सकाळचा नाश्ता न करणं भरपूर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. याने शरीरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कार्टिसोल हार्मोन्स जास्त रिलीज होतात. याने पुढे जाऊन पोटावरील चरबी वाढते. नाश्ता न केल्याने लो ब्लड शुगरची समस्याही होते. कारण मेंदुला सकाळी खाण्याची गरज असते, जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मेंदू स्पष्टपणे विचार करू शकत नाही. ग्लूकोजला मेंदुचं प्राथमिक ईंधन मानलं जातं.

नाश्ता करणं सोडल्याने मेंदुच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव बघायला मिळतो. अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांचे दोन ग्रुप केले. जेणेकरून नाश्ता सोडणाऱ्यांची तुलना नाश्ता करणाऱ्यांसोबत करता यावी. यात सहभागी लोकांचा एमआरआय करण्यात आला. ज्यात नाश्ता न करणाऱ्या लोकांचा मेंदू आकुंचन पावलेला दिसला. जो डिमेंशियाच्या लक्षणाचा भाग आहे. त्याशिवाय ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यात काही न्यूरो डिजनरेशन बायोमार्करचा स्तर त्या लोकांमध्ये अधिक होता जे नाश्ता स्कीप करत नव्हते. अशात डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे.

सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने व्यक्ती डिमेंशियाचा शिकार होऊ शकतो. डिमेंशिया मेंदुसंबंधी एक आजार आहे. यात मेंदुच्या कोशिकांचं नुकसान होतं आणि समजण्या-विचार करण्याची क्षमता कमी होते. डिमेंशियामध्ये स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता प्रभावीत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

3 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

3 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

3 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

3 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

5 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

6 तास ago