आरोग्य

औषधी वनस्पती आणि दूध

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात. औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात.

हळद आणि दूध: हळद ही औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीत कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं. हे कर्क्यूमिन अँटीइफ्लामेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे वेदना कमी करण्यास, स्नायूंना आराम करण्यास आणि रोगांपासून बरे होण्यास मदत करते.

दूध आणि अश्वगंधा: अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शरीरासाठी फायदेशीर असतं. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाचा खास गुण म्हणजे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे झोप, स्मरणशक्ती, स्नायूंचं आरोग्य स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

दूध आणि केशर: स्टॅमिना वाढवायचा असेल दुधात केशर मिसळा. केशरात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. सतत मूड स्विंग होणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

12 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago