1) केळीचे मूळ कापून त्याचा गर टाचावर १५ मिनिटे रगडावा. त्यानंतर टाचा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
2) टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरीन लावून पायमोजे घालून झोपावे. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने पाय धुवावेत. कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेे. त्यामुळे पायांच्या भेगा नाहीशा होऊन पाय नाजूक आणि उजळ होतील.
3) मधाच्या पोळ्यातील ताजे मेण काढून, वितळवून त्यात थोडी बोरीक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावल्यास चांगला परिणाम होतो.
4) आंघोळ झाल्यावर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावणेही फायदेशीर ठरते.
5) गरज नसेल तेव्हा पादत्राणे काढून ठेवावीत. ऑफिसमध्येही हाच नियम ठेवावा.
6) हिरव्यागार गवतावर चालणे हासुद्धा पायांच्या भेगा घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
7) जेवणामधील जीवनसत्त्वांच्या अभावीही भेगा पडू शकतात. त्यामुळे जेवणात ई जीवनसत्त्व, कॅल्शिअम, लोह, झिंक यांसारख्या पोषक घटकांचा जरूर समावेश करावा.
8) राळेचे मलम (तेल, पाणी, व राळ यापासून करतात. हे मलम रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर लावल्यास आराम मिळेल.)
(सोशल मीडियावरुन साभार)
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…