आरोग्य

डोळ्यात काजळ घालावे की नाही

घरात बाळ असले म्हणजे आईची सारखी धावपळ चाललेली असते. बाळाची आंघोळ, त्यांना नटवणे इत्यादी. बऱ्याच महिला बाळाच्या डोळ्यात काजळ घालतात. घरातील वयोवृद्ध स्त्रिया बाळाला काजळ लावण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या मते काजळ घातल्याने बाळाचे डोळे मोठे होतात, पाणीदार होतात व दृष्टी सुधारते. बरेच डॉक्टर मात्र डोळ्यात काजळ घालू नका असे कटाक्षाने सांगतात. काजळ डोळ्यात घालताना काजळातील जंतू व काजळ घालणाऱ्याच्या बोटावरील जंतू बाळाच्या डोळ्यात जातात व त्याला जंतू संसर्ग होऊ शकतो. क्वचित प्रसंगी काजळातील घटकांची अ‍ॅलर्जी असल्यास डोळ्यांना त्रास होईल. नखाने तर डोळ्याला इजाही होऊ शकते.

काजळ घालण्यामागचे व त्याच्या फायद्या तोट्या विषयी आपण बघितले. मग करावे तरी काय? स्वच्छ व निर्जंतुक पद्धतीने तयार केलेले काजळच (जर डोळ्यात काजळ घालायचेच असेल तर) डोळ्यांत घातल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. काजळाने डोळे मोठे दिसत असतील पण प्रत्यक्षात मोठे होत नाहीत. जळजळ झाल्याने डोळ्यांतून पाणी येऊन ते पाणीदार वाटले, तरी खऱ्या पाणीदार डोळ्यांसाठी सुयोग्य अशा पोषणाचेच सर्वाधिक महत्त्व असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

16 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago