घरात बाळ असले म्हणजे आईची सारखी धावपळ चाललेली असते. बाळाची आंघोळ, त्यांना नटवणे इत्यादी. बऱ्याच महिला बाळाच्या डोळ्यात काजळ घालतात. घरातील वयोवृद्ध स्त्रिया बाळाला काजळ लावण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या मते काजळ घातल्याने बाळाचे डोळे मोठे होतात, पाणीदार होतात व दृष्टी सुधारते. बरेच डॉक्टर मात्र डोळ्यात काजळ घालू नका असे कटाक्षाने सांगतात. काजळ डोळ्यात घालताना काजळातील जंतू व काजळ घालणाऱ्याच्या बोटावरील जंतू बाळाच्या डोळ्यात जातात व त्याला जंतू संसर्ग होऊ शकतो. क्वचित प्रसंगी काजळातील घटकांची अॅलर्जी असल्यास डोळ्यांना त्रास होईल. नखाने तर डोळ्याला इजाही होऊ शकते.
काजळ घालण्यामागचे व त्याच्या फायद्या तोट्या विषयी आपण बघितले. मग करावे तरी काय? स्वच्छ व निर्जंतुक पद्धतीने तयार केलेले काजळच (जर डोळ्यात काजळ घालायचेच असेल तर) डोळ्यांत घातल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. काजळाने डोळे मोठे दिसत असतील पण प्रत्यक्षात मोठे होत नाहीत. जळजळ झाल्याने डोळ्यांतून पाणी येऊन ते पाणीदार वाटले, तरी खऱ्या पाणीदार डोळ्यांसाठी सुयोग्य अशा पोषणाचेच सर्वाधिक महत्त्व असते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग…
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…