अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया.
चेरी, द्राक्ष, बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.
दररोज दुपारी एक वाटी दही प्या. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ते पचनव्यवस्था सुधारतात.
ज्या लोकांना मांसाहार जास्त आवडतो अशा लोकांनी कमी चरबी असलेले मांस खायला हवे. कारण मांस पचायला वेळ लागतो.
आलं, काळे मिरे, सैंधव मीठ आणि धणे या मसाल्यांचा जेवणात समावेश असायला हवा. हे मसाले जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर पचनकार्य सुधारतात.
व्हिटॅमिन-सी असलेले ब्रोकोली, टोमॅटो, किवी फळ, स्ट्रॉबेरी हे खावेत. रंगीत फळं,भाज्या भरपूर साऱ्या खाव्यात त्याने पोट साफ होते आणि अपचनाचा त्रास होत नाही.
सकाळी उठल्यावर व्यायाम आणि पोटाला मालीश केल्यास पचनशक्ती वाढते. काही चांगल्या तेलांनी पोटाची मालीश करावी.
सकाळी गरम पाणी प्यायला आवडत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा, पोटातले ऑसिड कमी होऊन पोट साफ राहील.
भूकेपेक्षा थोडे कमी खावे, त्यामुळे पचन व्यवस्थितपणे व्हायला मदतच होईल. तुम्ही कोणत्या प्रकारे खाता, कशा प्रकारे खाता यावरही पचन कार्य अवलंबून असते.
जेवायला मांडी घालून म्हणजे सुखासनात (भारतीय बैठक) बसावे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे, प्रत्येक घासाचा ज्युस बनवून पिला पाहिजे.
शांतपणे, समाधानाने, जेवणाचा आनंद घेत जेवले पाहिजे. त्यासाठी एखादा श्लोक म्हणून घरातील सर्व सदस्य एकत्र मिळून जेवायला बसायला हवे.
(सोशल मीडियावरुन साभार)
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…