मुख्य बातम्या

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर मेसाई या ठिकाणी एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. कान्हूर मध्ये मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला जास्त प्रमाणात मतदान कसे होईल त्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये पाण्यामुळे असलेली नाराजी मात्र दुर झालेली नसल्याचे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारी वरुन दिसुन आले.

 

“आधी पाणी द्या मग मत घ्या” अशी कान्हूर मेसाई येथील मतदारांमध्ये चर्चा आहे. अनेक मतदार मतदान केंद्रावरच न आल्याने कान्हूर मेसाई मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. वर्षानुवर्षे नागरिकांना राजकीय पुढाऱ्यांकडुन नुसती आश्वासनाची गाजर दाखवून मत घेतली जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ च असुन परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचाच पवित्रा घेतला. म्हणुनच कान्हूर मधील मतदानाची टक्केवारी जास्त प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कान्हूर मेसाई ग्रामस्थ काय पवित्रा घेणार…? याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

निवडणुकीच्या दरम्यान कान्हुर मेसाई येथील पंचवीस ते तीस युवकांनी एकञ येऊन “आधी पाणी द्या, मग मतदान घ्या” असा पविञा घेतला होता. सुमारे आठवडाभर हे तरुण गावात फिरुन नागरिकांना भेटून मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आग्रह करत होते. हि बाब पोलीसांच्या कानावर पडताच पोलीसांनी यातील काही तरुणांना बोलावून घेत समज देऊन सोडून दिले. माञ आपल्या न्याय हक्कासाठी लढणा-या तरुणांवर पोलिसांमार्फत दबाव टाकला जातोय ही बाब ग्रामस्थांना खटकली परिमाणी ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

8 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

8 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

9 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago