मुख्य बातम्या

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर मेसाई या ठिकाणी एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. कान्हूर मध्ये मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला जास्त प्रमाणात मतदान कसे होईल त्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये पाण्यामुळे असलेली नाराजी मात्र दुर झालेली नसल्याचे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारी वरुन दिसुन आले.

 

“आधी पाणी द्या मग मत घ्या” अशी कान्हूर मेसाई येथील मतदारांमध्ये चर्चा आहे. अनेक मतदार मतदान केंद्रावरच न आल्याने कान्हूर मेसाई मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. वर्षानुवर्षे नागरिकांना राजकीय पुढाऱ्यांकडुन नुसती आश्वासनाची गाजर दाखवून मत घेतली जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ च असुन परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचाच पवित्रा घेतला. म्हणुनच कान्हूर मधील मतदानाची टक्केवारी जास्त प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कान्हूर मेसाई ग्रामस्थ काय पवित्रा घेणार…? याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

निवडणुकीच्या दरम्यान कान्हुर मेसाई येथील पंचवीस ते तीस युवकांनी एकञ येऊन “आधी पाणी द्या, मग मतदान घ्या” असा पविञा घेतला होता. सुमारे आठवडाभर हे तरुण गावात फिरुन नागरिकांना भेटून मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आग्रह करत होते. हि बाब पोलीसांच्या कानावर पडताच पोलीसांनी यातील काही तरुणांना बोलावून घेत समज देऊन सोडून दिले. माञ आपल्या न्याय हक्कासाठी लढणा-या तरुणांवर पोलिसांमार्फत दबाव टाकला जातोय ही बाब ग्रामस्थांना खटकली परिमाणी ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

7 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

7 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago