आरोग्य

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खाव

वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात.

जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. खासकरून जेव्हा गोड पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग्स होतात तेव्हा साखरेपासून तयार झालेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यानं डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. साखर ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कारणीभूत ठरते.

वजन कमी करण्यासाठी साखर उत्तम की गूळ असा प्रश्न अनेकांना पडतो. साखर आणि गूळ या दोन्हींमध्ये गोडवा असतो. साखर खावी की गूळ याबाबत लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात.अधिक साखर खालल्यानं शरीराला जास्त कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढू लागते. साखरेमुळे लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. ज्यामुळे हार्ट डिसिज,कॅन्सर, टाईप २ डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अधिक साखर खाल्ल्यांन दात किडतात. याशिवाय लिव्हरच्या समस्यांचा धोका असतो. जास्त साखर खाल्ल्यानं शरीरात कोलेजन फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही.

१०० ग्रॅम गुळात जवळपास ३८५ कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढू शकते. गुळ साखरेपेक्षा उत्तम ठरतो. पण गुळाच्या सेवनानंही शुगर लेव्हल वाढू शकते. काही लोकांमध्ये एलर्जीचं कारण ठरू शकते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे सेवन केल्यानं शरीरात गरमी वाढते. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते ऊन्हाळ्यात पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

गूळ एक सुपरफूड आहे. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. गुळात आयर्न असते ज्यामुळे एनिमियाची समस्या दूर होते. हाडं मजबूत होतात. यात पचन एंजाईम्स असतात ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. गुळाच्या सेवनानं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. गुळानं इम्यून सिस्टिम मजबूत राहते. गूळ आणि साखर दोन्हींचा स्त्रोत ऊस हाच असतो.

दोन्ही बनवण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. गूळ एक नैसर्गिक स्विटनर आहे. जो कमीत कमी प्रोसेसमध्ये तयार केला जातो. यात साखरेच्या तुलनेत व्हिटामीन्स, खनिजं जास्त असतात. तर साखर बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. याशिवाय यात कॅलरीज खूप जास्त असतात.

गूळ तयार करताना ऊसाच्या रसातील अनेक पोषक तत्व घातले जातात. साखरयुक्त उत्पादनांचे अत्याधिक सेवन वाढवल्यास डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. याशिवाय उसापासून तयार झालेल प्रोडक्ट्स आहारात समाविष्ट केल्यानं व्यक्तीला लाभदायक फायदे मिळू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

36 मिनिटे ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

5 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

6 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

6 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

6 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

6 तास ago