शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण विभागाने चालढकल केली होती.
यासंदर्भात वाळुंज यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संजय नायकडे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याच्या कारणाने ही गंभीर समस्या दुर्लक्षित केली जात होती. त्यामुळे वाळुंज यांनी थेट ग्रामविकास विभाग मंत्री आणि सचिवांकडे तक्रार दाखल केली.
या पाठपुराव्याचा त्वरित परिणाम झाला असून, दि. २४ मार्च २०२५ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांनी अन्नापुर शाळेला भेट देऊन एका शिक्षकाची तातडीने तोंडी नेमणूक केली. तसेच, लवकरच रिक्त असलेली पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक पदे भरण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शाळांचा पट कमी…
गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३० ने घटली आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांतून जिल्हा परिषद शिक्षण विभागात कर्तव्यदक्ष आणि तडफदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागात भ्रष्टाचार वाढल्याने योग्य प्रशासनासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशीही मागणी वाळुंज यांनी केली आहे. या प्रकरणी लवकरच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन संपूर्ण बाब मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जर वेळ पडली, तर शिक्षण व्यवस्थेतील अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील वाळुंज यांनी दिला आहे. शिरूर तालुक्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांमध्येही अशा समस्या असल्यास त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.
निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…