आरोग्य

पाय सुजतात, जाणुन घ्या उपाय…

पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही. अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय पूर्ववत होऊ दे. अशा स्थितीत कधी कधी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा शक्य होत नाही किंवा डॉक्टर कधी कधी उपलब्ध नसतात.

अशी वेळ आल्यास काय करावे…

तर तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता. तुम्हाला पायाची सूज कमी करू शकतील असे काही लाभदायक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करून पायाच्या सुजेपासून आराम मिळवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार.

जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्‍नीशियम सल्‍फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्‍नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.

हा उपाय तुम्हाला सर्वांना माहित असेलच आणि कोणत्याही अवयवावर सूज आली किंवा अवयव दुखू लागला, वेदना होऊ लागल्या तर हा सगळ्यात सोप्पा पर्याय आपण वापरून पाहतोच. तर जेव्हा पायाला सूज येते तेव्हा एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा. बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून हे उपाय वापरून पहा, जर या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र तुम्ही शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

9 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

9 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

10 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

12 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

23 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

23 तास ago