पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही. अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय पूर्ववत होऊ दे. अशा स्थितीत कधी कधी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा शक्य होत नाही किंवा डॉक्टर कधी कधी उपलब्ध नसतात.
अशी वेळ आल्यास काय करावे…
तर तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता. तुम्हाला पायाची सूज कमी करू शकतील असे काही लाभदायक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करून पायाच्या सुजेपासून आराम मिळवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार.
जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्नीशियम सल्फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.
हा उपाय तुम्हाला सर्वांना माहित असेलच आणि कोणत्याही अवयवावर सूज आली किंवा अवयव दुखू लागला, वेदना होऊ लागल्या तर हा सगळ्यात सोप्पा पर्याय आपण वापरून पाहतोच. तर जेव्हा पायाला सूज येते तेव्हा एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा. बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून हे उपाय वापरून पहा, जर या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र तुम्ही शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…