आरोग्य

‘या’ 3 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही शिंगाड्याचं सेवन करु नका…

शिंगाडा ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं देखील म्हणतात. हिवाळ्यात शिंगाड्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात हे फळ सहज मिळतं आणि आरोग्यासाठी लाभदायक देखील ठरतं. चवीला गोड आणि कुरकुरीत असलेल्या या फळामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या घटक असतात. जे शरीराला अनेक फायदे देण्यासाठी फायदेशीर आहेत. पण असं म्हणतात ना की, जास्त प्रमाणात काहीही सेवन करणं शरीरासाठी हानिकारक असू शकतं. तसंच काही शिंगाड्याचं देखील आहे.

शिंगाड्याचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते विविध आरोग्य समस्या निर्माण करू शकतं. तर, वॉटर चेस्टनट खाण्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया. सांगायचं झालं तर, फार कमी लोकांना माहित असेल की शिंगाडे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही, जाणून घ्या कोणत्या लोकांनी शिंगाडे खाणं टाळावं.

‘या’ तीन समस्या असणाऱ्या व्यक्तींनी शिंगाडे खाऊ नये…

शिंगाड्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, जे पचनासाठी योग् नसतं… पण, जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जडपणा येऊ शकतो. म्हणून, पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात सेवन करावं.

मधुमेह (डायबिटीज): शिंगाड्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिंगाड्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखर वाढू शकते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी शिंगाडे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सर्दी – खोकला – वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे अनेकांना सर्दी खोकला होतो… हिवाळ्यात जास्त प्रमाणात शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरात थंडी वाढू शकते, ज्यामुळे सर्दी, घसा खवखवणे किंवा कफ यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्या लोकांना आधीच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास आहे त्यांनी शिंगाडे खाणं टाळाव.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago