आरोग्य

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते.

थंड पाणी शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करते. अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेत एन्झाईम्स आणि जठरासंबंधी रस सक्रिय असतात. ज्यावेळी आपण थंड पाणी पितो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान अचानक कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. खूप थंड पाणी पोटाची आग कमकुवत करते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही.

थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने होणारा परिणाम 

1) शरीराचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते. जर गरम पदार्थ खाल्ल्याने लगेच थंड पदार्थ खाल्ले तर शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवतात.

2) जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक तापमानावर परिणाम होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो.

3) थंड पाण्यामुळे पचन एंजाइमची प्रक्रिया मंदावते. या पचनाच्या समस्येमुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

4) गरम पदार्थांसोबतच शरीराचे तापमान जास्त असताना थंड पाणी पिण्याची काळजी घ्यायला हवी. व्यायाम केल्यानंतर लगेच फ्रीजमधले पाणी पिणे शरीराला हानिकारक ठरु शकते. व्यायाम केल्यानंतर शरीर गरम होते आणि अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात बदल होतो. ज्यामुळे स्नायूंचा कडकपणा आणि थकवा वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शालेय शिक्षण विभाग राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग; लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग बनला असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची…

3 तास ago

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…

12 तास ago

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…

12 तास ago

संजय राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; खासदार ज्योती वाघमारे

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…

12 तास ago

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…

12 तास ago

शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…

17 तास ago