आरोग्य

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते.

थंड पाणी शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करते. अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेत एन्झाईम्स आणि जठरासंबंधी रस सक्रिय असतात. ज्यावेळी आपण थंड पाणी पितो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान अचानक कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. खूप थंड पाणी पोटाची आग कमकुवत करते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही.

थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने होणारा परिणाम 

1) शरीराचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते. जर गरम पदार्थ खाल्ल्याने लगेच थंड पदार्थ खाल्ले तर शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवतात.

2) जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक तापमानावर परिणाम होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो.

3) थंड पाण्यामुळे पचन एंजाइमची प्रक्रिया मंदावते. या पचनाच्या समस्येमुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

4) गरम पदार्थांसोबतच शरीराचे तापमान जास्त असताना थंड पाणी पिण्याची काळजी घ्यायला हवी. व्यायाम केल्यानंतर लगेच फ्रीजमधले पाणी पिणे शरीराला हानिकारक ठरु शकते. व्यायाम केल्यानंतर शरीर गरम होते आणि अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात बदल होतो. ज्यामुळे स्नायूंचा कडकपणा आणि थकवा वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

17 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

19 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

20 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

20 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

22 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

22 तास ago