पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात साप फिरत नाहीत.
घरातल्या एखाद्या खोलीत अडगळीचं सामान ठेवलेलं असेल तर ती खोली व्यवस्थित पॅक करा. त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवू नका. अन्यथा अडगळीमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते.
डांबर गोळ्यांच्या वासाने साप दूर जातो. त्यामुळे जिथून साप येण्याची भीती असते त्या सगळ्याच ठिकाणी डांबर गोळ्या टाकून ठेवा.
घराच्या आजुबाजुला गवतीचहा, झेंडू, कांद्याची पात, लसणाची पात, पुदिना अशी रोपं लावा. या रोपांच्या वासामुळे साप लांब राहण्यास मदत होते.
cedarwood essential oil घ्या आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग पावडर घाला. हे तेल घराच्या आजुबाजुला नियमितपणे शिंपडा. साप दूर पळतील.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…