पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात साप फिरत नाहीत.
घरातल्या एखाद्या खोलीत अडगळीचं सामान ठेवलेलं असेल तर ती खोली व्यवस्थित पॅक करा. त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवू नका. अन्यथा अडगळीमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते.
डांबर गोळ्यांच्या वासाने साप दूर जातो. त्यामुळे जिथून साप येण्याची भीती असते त्या सगळ्याच ठिकाणी डांबर गोळ्या टाकून ठेवा.
घराच्या आजुबाजुला गवतीचहा, झेंडू, कांद्याची पात, लसणाची पात, पुदिना अशी रोपं लावा. या रोपांच्या वासामुळे साप लांब राहण्यास मदत होते.
cedarwood essential oil घ्या आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग पावडर घाला. हे तेल घराच्या आजुबाजुला नियमितपणे शिंपडा. साप दूर पळतील.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…