आरोग्य

चेहऱ्यापुरतीच नव्हे, तर केसांसाठीही आहे ‘ही’ नैसर्गिक देणगी

मुलतानी मातीचा वापर अनेकजण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी करतात. पण, हीच माती केसांसाठीही तितकीच उपयोगी ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मुलतानी मातीच्या नियमित वापराने केस मजबूत, जाड व लांब होतात. त्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार करायचा, याची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

तेलकट केसांसाठी हेअर मास्क

दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि एक लहान चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.

कोरडे आणि निर्जीव केसांसाठी

दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही आणि एक चमचा मध मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना आणि टाळूवर लावून २० मिनिटांनी धुवा.

केस गळतीवर उपाय

केस जास्त गळत असतील तर दोन चमचे मुलतानी माती, दोन चमचे मेथी पावडर आणि एक चमचा दही एकत्र करा. हे मिश्रण अर्धा तास केसांवर ठेवून मग धुवा.

केस वाढवण्यासाठी हेअर मास्क

दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून पेस्ट करा. ही पेस्ट ३० मिनिटे टाळूवर व केसांवर ठेवून नंतर शॅंपूने धुवा.

फायदे काय

मुलतानी माती हेअर मास्कमुळे केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतात. टाळूवरील खाज, कोंडा होणे या सारख्या समस्यांवर आराम मिळतो आणि केस गळती कमी होते. यासोबतच केस वाढण्याचा वेगही वाढतो. मात्र, वापरापूर्वी त्वचेवर ‘पॅच टेस्ट’ करून खात्री करा की ही माती तुमच्या त्वचेला सूट होतेय का? आणि मगच वापरा आणि फरक अनुभवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

57 मिनिटे ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

60 मिनिटे ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

1 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

1 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

1 तास ago