आरोग्य

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस येऊ लागतो आणि आता पुढचं काम अजिबातच करायला नको असं वाटू लागतं. सरळ पांघरुण घेऊन झोपण्याची इच्छा होते. जे लोक लंचनंतर घरीच असतात त्यांना थोडी डुलकी मारणं शक्य आहे पण वर्किंग लोकांचं काय म्हणूनच त्यांच्यासाठी ३ खास टिप्स.. यामुळे त्यांना दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटेल आणि झोप येणार नाही.

दुपारच्या जेवणानंतर आळस, सुस्ती येऊ नये म्हणून काय करावे

1) यामध्ये त्या सांगत आहेत की दुपारच्या जेवणामध्ये पोळी, भाकरी, भात असे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. त्याऐवजी ओट्स, भाज्या, मल्टीग्रेन पराठे, पनीर, टोफू असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. कारण यामुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही. आणि त्यामुळे मग आळस, गुंगी, सुस्ती येत नाही.

२) अनेक जणांना दुपारच्या जेवणात ताक पिण्याची सवय असते. ताकामुळे मेलॅटोनिन हार्मोन वाढतो. या हार्मोनमुळे आपल्याला एकदम शांत, रिलॅक्स वाटतं. त्यामुळे मग झोप आल्यासारखी होते. म्हणूनच ज्यांना दुपारी जेवल्यानंतर खूप सुस्ती येते त्यांनी जेवणात ताक पिणं टाळायला हवं.

3) जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे चाला. चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. त्यामुळे मग आळस, सुस्ती येत नाही. शिवाय अन्नपचनही चांगले होते. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटून तुम्ही उत्साहाने कामे उरकाल.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

26 मिनिटे ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

28 मिनिटे ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

34 मिनिटे ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

49 मिनिटे ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

55 मिनिटे ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

60 मिनिटे ago