आरोग्य

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस येऊ लागतो आणि आता पुढचं काम अजिबातच करायला नको असं वाटू लागतं. सरळ पांघरुण घेऊन झोपण्याची इच्छा होते. जे लोक लंचनंतर घरीच असतात त्यांना थोडी डुलकी मारणं शक्य आहे पण वर्किंग लोकांचं काय म्हणूनच त्यांच्यासाठी ३ खास टिप्स.. यामुळे त्यांना दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटेल आणि झोप येणार नाही.

दुपारच्या जेवणानंतर आळस, सुस्ती येऊ नये म्हणून काय करावे

1) यामध्ये त्या सांगत आहेत की दुपारच्या जेवणामध्ये पोळी, भाकरी, भात असे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. त्याऐवजी ओट्स, भाज्या, मल्टीग्रेन पराठे, पनीर, टोफू असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. कारण यामुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही. आणि त्यामुळे मग आळस, गुंगी, सुस्ती येत नाही.

२) अनेक जणांना दुपारच्या जेवणात ताक पिण्याची सवय असते. ताकामुळे मेलॅटोनिन हार्मोन वाढतो. या हार्मोनमुळे आपल्याला एकदम शांत, रिलॅक्स वाटतं. त्यामुळे मग झोप आल्यासारखी होते. म्हणूनच ज्यांना दुपारी जेवल्यानंतर खूप सुस्ती येते त्यांनी जेवणात ताक पिणं टाळायला हवं.

3) जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे चाला. चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. त्यामुळे मग आळस, सुस्ती येत नाही. शिवाय अन्नपचनही चांगले होते. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटून तुम्ही उत्साहाने कामे उरकाल.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

5 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

6 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

7 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

7 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago