महाराष्ट्र

हिंजवडीतील आयटी पार्कमधील त्या कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद

पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) सल्लागार कंपनीने जवळपास ४०० नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हे आयटी कर्मचारी आता रस्त्यावर आले आहेत.

संबंधित कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये शुल्क आकारले. प्रशिक्षणानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रोजेक्ट अलोकेशनसह ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगार निश्चित असल्याचे सांगण्यात आले.

या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण व दोन महिन्यांचा मानधन तर मिळाले, मात्र त्यानंतरच्या चार महिन्यांपासून पगार मिळालाच नाही. यावेळी अनेक जण कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करीत होते, तरीही वेतन देण्यात आले नाही. शिवाय, कंपनीचे कार्यालयही बहुतेक वेळा बंद असते. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडे चौकशी केली असता, कंपनीकडून उलट पोलिसांना बोलावण्यात आले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आयटी फोरमची मदत

या प्रकरणी पीडित कर्मचाऱ्यांनी फोरम फॉर आयटी एम्पलॉइज (एफआयटीई) या संघटनेकडे धाव घेतली आहे. संघटनेने हा मुद्दा आता कामगार आयुक्तांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमने ही घटना गंभीर फसवणूक असल्याचे म्हटले आहे. हा केवळ कामगार वाद नसून फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.

फोरमची नवीन उमेदवारांना सूचना

पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका

मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू आणि आर्थिक स्थिती तपासा

पगार न देता कंपनी बंद करणे हा कामगार वाद नसून थेट फसवणुकीचा गुन्हा आहे.

या घटनेमुळे आयटी क्षेत्रात नोकरीसाठी धडपडणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीकडे सरकार आणि कामगार यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका फोरमने मांडली आहे.

दरम्यान आयटी क्षेत्रात रोजगार कपातीचे वारे सुरू आहे. अनेक बड्या कंपन्यांनी मनुष्यबळ कपातीचे धोरण स्वीकारले आहे. यामागे आयटी क्षेत्रातील मंदीचे कारण आहे. देशातील आघाडीच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीने नुकतीच १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. यामुळे आयटीतील रोजगारांचा मुद्दा चर्चेत आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

15 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

16 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago