जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात.
जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे… याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. याच्या वापराने दृष्टी मंदावते आणि नपुंसकत्व येते असा समज आहे.
जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी करतात. खोडाच्या अंतर्सालीपासून धागा निघतो. जवस हे समशीतोष्ण प्रदेशातील रोप आहे. रेशेदार पिकात याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच्या रेशेपासुन कापड, दोरी, रस्सी आणि टाट बनवले जाते याच्या बियांपासून तेल निघते या तेलाचे वापर वार्निश, रंग, साबुन, रोगन, पेन्ट तयार करण्यासाठी केला जातो. चीन सनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे रेशे साठी सनला उत्पादित करणारे देशात रूस, पोलैण्ड, नीदरलैण्ड, फ्रांस, चीन आणि बेल्जियम प्रमुख आहे व बी काढण्यातील देशात भारत, संयुक्त राज्य अमरीका आणि अर्जेण्टाइनाचे नाव उल्लेखनीय आहे. सनचे प्रमुख निर्यातक रूस, बेल्जियम तथा अर्जेण्टाइना आहे.
जवसाला मंदगंधयुक्त, मधुर, बलकारक, किंचित कफवात-कारक, पित्तनाशक, स्निग्ध, पचनास भारी, गरम, पौष्टिक, कामोद्दीपक, पाठीच्या दुखणे कमी करणारे व सूजेला नष्ट करणारे म्हटले अाहे… गरम पाण्यात टाकून बीज किंवा याच्या बरोबर एक तृतीयांश भाग मुलेठीचा चूर्ण मिसळून क्वाथ (काढ़ा) बनवले जाते जे रक्तातिसार आणि मूत्र संबंधी आजारात उपयोगी म्हणले आहे.
जवस तेलाचे उपयोग
हे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.
औषधी गुणधर्म
बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्या भाजण्यावरचा फायदेशीर उपाय आहे.
जवसामध्ये ‘ओमेगा-३’ या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% राहते त्यामुळे, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत… जवस हे रक्तातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण ९ ते १८ टक्क्याने कमी करते. हे सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे ‘ग्लिसराईड’चे प्रमाण कमी होते.याचे सेवनाने आतड्याचा कर्करोग होत नाही. अकाली वृद्ध्त्व टळते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…