महाराष्ट्र

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराबाबत ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली.यंदाही ‘खड्डेमुक्ती’साठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर, “खड्डे कायम खर्चाचा महामेळा” अशी तीव्र टीका करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरवर्षी कोट्यवधी खर्च, परिणाम शून्य:मागील काही वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही, पावसाळ्यात हजारो खड्डे पुन्हा निर्माण होतात.यंदाचा ९० कोटींचा निधी:‘खड्डेमुक्ती’साठी पुन्हा ९० कोटी रुपये अपेक्षित, मात्र खर्चाचा स्पष्ट हिशोब उपलब्ध नाही.निकृष्ट कामांची पुनरावृत्ती: नव्याने केलेले डांबरी/काँक्रीट रस्ते अल्पावधीत खराब होणे ही गंभीर बाब असून, गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह.

विशिष्ट ठिकाणी वारंवार कामे देऊन निधीचा अपव्यय केल्याचा संशय.

टेंडर प्रक्रियेत संशयास्पद बाबी:

ठेकेदार निवडीमध्ये पारदर्शकतेचा अभाव व संगनमताची शक्यता नाकारता येत नाही. ॲड. अमोल मातेले यांचे स्पष्ट मत:“मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करून ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ सुरू आहे. दरवर्षी नवे आकडे, नवे आश्वासन पण रस्ते तेच खड्ड्यांनी भरलेले! यंदाही ९० कोटींचा निधी अपेक्षित आहे, म्हणजे ‘खड्डे कायम आणि पैशांचा मेळा सुरूच’ अशी परिस्थिती आहे. हा प्रकार म्हणजे ‘वरून गोड, आतून सडलेला’ कारभार आहे.”

प्रशासनाला पाठवलेल्या ई-मेलमधील प्रमुख मागण्या:

मागील ५ वर्षांच्या ‘खड्डेमुक्ती’ खर्चाचा सविस्तर ऑडिट अहवाल जाहीर करावा.यंदाच्या ९० कोटींच्या निधीचा कामनिहाय तपशील सार्वजनिक करावा.सर्व कामांवर तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणी सक्तीची करावी.निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करावे.जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी.नागरिकांसाठी ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणाली सुरू करावी.

सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात कायदेशीर कारवाई, जनआंदोलन व उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.मुंबईतील ‘खड्डेमुक्ती’ हा केवळ घोषणांचा विषय न राहता प्रत्यक्षात तो भ्रष्टाचाराचा संशयित मॉडेल बनला आहे.“जशी करणी तशी भरणी” या म्हणीप्रमाणे दोषींना जबाबदारी निश्चित करून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सुनेत्रा वहिनींवर टीका म्हणजे महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान; काँग्रेसने आधी स्वतःचा इतिहास पाहावा; धनंजय मुंडे

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत…

1 तास ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

6 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

17 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

17 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

21 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

21 तास ago