दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको).
सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे.
पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे.
प्लास्टिक मध्ये साठवलेले पाणी अथवा प्लास्टिक बॉटल मधील विकतचे पाणी टाळावे. प्लास्टिक बॉटल मध्ये पुन्हा पुन्हा पाणी भरून वापरू नये.
झऱ्याचे अथवा वाहत्या नदीचे पाणी हे स्वच्छ असते, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा.
पाणी कधीही गार-गरम एकत्र करून पिऊ नये.
पाण्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते, तसेच रक्त पातळ होते.
पाण्यामुळे बद्धकोष्ठता नष्ट होते.
पाण्यामुळे आळसपणा कमी होतो, तसेच डोक्यावरील केस गळती कमी होते.
पाण्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. तारूण्य टिकून राहण्यास मदत होते.
पाण्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. किडनी स्टोन होत नाहीत.
पाण्यामुळे अन्नपचन चांगले होते. मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…