आरोग्य

पाणी म्हणजेच जीवन

दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको).

सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे.

पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे.

प्लास्टिक मध्ये साठवलेले पाणी अथवा प्लास्टिक बॉटल मधील विकतचे पाणी टाळावे. प्लास्टिक बॉटल मध्ये पुन्हा पुन्हा पाणी भरून वापरू नये.

झऱ्याचे अथवा वाहत्या नदीचे पाणी हे स्वच्छ असते, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा.

पाणी कधीही गार-गरम एकत्र करून पिऊ नये.

पाण्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते, तसेच रक्त पातळ होते.

पाण्यामुळे बद्धकोष्ठता नष्ट होते.

पाण्यामुळे आळसपणा कमी होतो, तसेच डोक्यावरील केस गळती कमी होते.

पाण्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. तारूण्य टिकून राहण्यास मदत होते.

पाण्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. किडनी स्टोन होत नाहीत.

पाण्यामुळे अन्नपचन चांगले होते. मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

17 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago