आरोग्य

पॅरालिसिस नेमका कशामुळे होतो अर्धांगवायू आणि त्यामागील कारणे

हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू. यालाच पॅरॅलिसिस, ब्रेन अॅटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हॅस्क्युलर अॅक्सिडेंट म्हणतात. अर्धांगवायूविषयी समाजामध्ये पुरेशी जागृती नाही. हा आजार रुग्णाचे विविध स्तरांवर नुकसान करतो. जीवाला तर धोका असतोच परंतु वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या विकलांगता मागे ठेवून जातो. जसे हातापायामधील लुळेपणा, तोतरेपणा, विस्मरण इ. यामुळे रुग्णाला काम करणे शक्य होत नाही, तो त्यासाठी अपात्र होतो. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच मर्यादा येते. काही रुग्णांना इतके अपंगत्व येते की दैनंदिन क्रिया जसे अंघोळ, कपडे घालणे, जेवणे यासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यांचे जीवन परावलंबी होते. यामुळे रुग्ण डिप्रेशनमध्ये जातो. त्याचे जणू आयुष्यच उद्‌ध्वस्त होते.

अर्धांगवायू होण्याची कारणे

या कारणांना आपण धोक्याचे घटक म्हणू. अर्धांगवायूचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

१) इस्चेमिक: ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त आणि चरबीची (कोलेस्टेरॉल) गुठळी अडकून मेंदूच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाह बंद होणे.

२) हिमरेजिक: मेंदूतील रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होणे.

दोन्ही प्रकारचे अर्धांगवायू होण्यामागचे धोक्याचे घटक हे काही आजार आहेत व काही सवयीदेखील कारणीभूत आहेत. वय वाढत जाते तसे आपल्याला पॅरॅलिसिस होण्याचा संभव वाढत जातो. कारण वय वाढत जाते तसे रक्तवाहिन्या मऊ राहत नाहीत. कडक होतात आणि त्यांमध्ये चरबी जमा होत जाते. ज्यामुळे गुठळी होण्याचा संभव वाढतो. ६० वर्षे वयानंतर पॅरॅलिसिस होण्याचा धोका वाढत जातो. स्त्रियांना ४५ वर्षे वयापर्यंत स्त्रियांचे हार्मोन इस्ट्रोजेन हे पॅरॅलिसिसपासून संरक्षण देते. त्यानंतर मात्र हे संरक्षण मिळत नाही. या आजारामध्ये सर्वांत मोठा शत्रू आहे रक्तदाब. सतत जास्त दाबामुळे रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो. तसेच रक्तवाहिन्यांची आतली त्वचा जाड होऊन गुठळी निर्माण होऊन रक्तपुरवठा बंद होऊ शकतो.

दुसरा शत्रू आहे मधुमेह

मधुमेहामुळे विविध प्रकारे रक्तप्रवाह कमजोर होतो व गुठळी होण्यासाठीचे पोषक वातावरण रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होते.

तिसरे कारण आहे, हायपरकोलेस्ट्रॉलेमिया. म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे.ही चरबी रक्तवाहिन्यांत जाऊन बसते. त्यामुळे गुठळी होण्याचा आणि पर्यायाने रक्तप्रवाह बंद पडण्याचा धोका वाढतो.

हृदयाचा कोणताही आजार पॅरॅलिसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो कारण हृदयाच्या आजारांमध्ये हृदयात गुठळी होते व ती सुटून मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते.

लठ्ठपणा या आजारामुळेही रक्तवाहिन्यामध्ये चरबी व गुठळ्या बनून पॅरॅलिसिस होण्याचा धोका वाढतो.

जीवनसत्त्व बी १२ च्या कमतरतेमुळे रक्तात असे काही घटक वाढतात जे गुठळी होण्यास पोषक वातावरण तयार करतात. कुठल्याही अपघातामुळे रक्तवाहिनीला झटका बसला तर रक्तवाहिनीच्या आतली त्वचा फाटून गुठळी बनू शकते. रक्तवाहिन्यांना सूज येणे म्हणजेच व्हॅस्क्युलायटिस* या दुर्मीळ आजारामुळेही स्ट्रोक येऊ शकतो.

अर्धांग वायू होऊ नये म्हणून काय टाळू शकता. तंबाखू, सिगारेट, मद्य, गुटख्याच्या सेवनाची वाईट सवयही पॅरॅलिसिसला कारणीभूत ठरते. बैठी जीवनशैली, कामामध्ये कष्टाचा अभाव, व्यायाम न करणे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कारणे आहेत. हवा व पाण्यामधील प्रदूषणामुळेही रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे पॅरॅलिसिसला कारणीभूत असलेले मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आदी आजार होऊ न देणे, जीवनशैली आरोग्यदायी ठेवणे, स्वच्छ वातावरणात राहणे अशी काळजी घेऊन आपण पॅरॅलिसिस टाळू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

24 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

24 तास ago