आरोग्य

कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. धूळ जमा होते आणि जेव्हा आपण शूज काढतो तेव्हा घामाच्या दुर्गंधीने डोकं गरगरतं. असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पायांमध्ये भरपूर स्वेट ग्लॅंड असतात. घामाला स्वत:चा असा काही गंध नसतो. पण घाम आणि डेड स्किन बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा दुर्गंधी येऊ लागते. सॉक्स घामाला शोषूण घेतात. त्या ओलावा असल्याने त्यात फंगस आणि बॅक्टेरिया वाढतात. सॉक्समध्ये भरपूर धूळ आणि इतरही अनेक कीटाणू असतात.

टी-शर्टच्या तुलनेत सॉक्समध्ये अधिक बॅक्टेरिया असतात. याचा अर्थ असा की, सॉक्स भलेही स्वच्छ दिसतात, पण त्यांमध्ये भरपूर बॅक्टेरिया आणि फंगस असतात.

मग या सॉक्समधील घाण, धूळ आणि बॅक्टेरिया केवळ पायांपर्यंत मर्यादित राहत नाहीत. ते आपला बेड, पाय, भांडी, भाज्या, सोफा घरात सगळीकडे पसरतात. असे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरले तर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरू नका. भलेही ते स्वच्छ दिसत असतील. पण लपलेली घाण आणि बॅक्टेरिया दिसत नसतात. पाय रोज साबणाने धुवावे आणि कापडाने पुसा. खासकरून बोटांच्या मधली जागा कोरडी ठेवा.

सॉक्स चांगले स्वच्छ करण्यासाठी ते उलटे करून धुवावेत. सॉक्स धुण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे गरम पाणी. याने बॅक्टेरिया आणि फंगस मरतात. जर थंड पाण्याने धुवत असाल तर सॉक्स उन्हात चांगले वाळत घाला.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

5 मिनिटे ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

55 मिनिटे ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

1 तास ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

1 तास ago

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…

2 तास ago

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…

2 तास ago