आरोग्य

घरोघर महिलांचा स्ट्रेस-चिडचिड कशाने वाढते? अनेकजणी सतत रागावलेल्या का असतात

पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत. असा एक अभ्यास नुकताच वाचला. विशेषतः नोकरदार स्त्री-पुरुषांचा हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात साधारण असं आढळलं की सुमारे ७२ टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे. त्यांची अत्यंत चिडचिड होते. अतिशय मूड स्विंग्ज होतातच; पण त्यासोबतच त्यांना रडू येतं, निराश वाटतं आणि मुख्य म्हणजे अत्यंत ताणाने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

आपल्याला स्ट्रेस प्रचंड आहे असं सुमारे ५४ टक्के पुरुषांनीही सांगितलं; पण तरी ढोबळ आकडेवारीही विचारात घेता स्ट्रेस अधिक असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. आता प्रश्न असा आहे की बायकांनाच जास्त स्ट्रेस येण्याचं कारण काय आहे

सतत काम-चिडचिड-वैताग कशाने

1) एकतर हे मान्यच करावं लागेल की महिलांवर कामाचा बोजा अधिक आहे. कार्यालयातील कामं सांभाळताना घरकाम, मुलांची देखभाल, वडिलधाऱ्यांची आजारपणं ही सगळी जबाबदारी त्यांना चुकलेली नाही.

2) घरकाम-स्वयंपाक यासाठी मदतनीस असली तरी रोज काय भाजी करायची ते मुलांचे प्रोजेक्ट करणं ही सारी व्यवधानं महिलांना सांभाळावीच लागतात.

3) कामाचं नियोजन, मदत-वेळा पाळणं हे सारं सतत केल्यानं मनावरचा ताण वाढतो.

4) काही कामं आपण नाही केली तरी चालतात हे महिला मान्य करत नाहीत. सुपरवूमन ट्रॅपमध्ये त्या स्वत:ही अडकलेल्या असतात.

5) आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष सतत केले जाते.

उपाय असतो का

शोधला तर नक्की सापडतो.

आपल्या छंदाला, आनंदाला आपण वेळ देतो का?

कामाचा प्राधान्यक्रम ठरवून मदत मागतो का?

मदत मागितली तर मिळते यावर विश्वास ठेवून नियोजन केले तर ताण कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

6 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

6 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

6 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

17 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

17 तास ago