दिवसभरात योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आयुर्वेदा नुसार, जेवणाची योग्य वेळ केवळ आपल्या भूकेवर अवलंबून नसते, तर ती आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर (बॉडी क्लॉक) देखील परिणाम करते. योग्य वेळी योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच, शिवाय दिवसभर शरीर उत्साही राहते. आयुर्वेदा नुसार, दिवस भरातील आपल्या खाण्याची योग्य वेळ कोणती असावी.
योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा योग्य तो आहार न घेतल्याने त्याचा आपल्या पचनावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. योग्य वेळेवर जेवण न करणे, नाश्त्याच्या वेळा चुकवणे यांसारख्या सवयी चुकीच्या आहेतच, तसेच या चुकांचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो.
१) सकाळचा नाश्ता (सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत) हलका आणि पौष्टिक आहार घ्या.
सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे.
२) दुपारचे जेवण (दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) थोडा जड आहार घ्यावा
दुपारच्यावेळी पचनशक्ती सर्वात जास्त चांगली असते, ज्यामुळे शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात. यासाठीच तुमच्या दुपारच्या जेवणात डाळ, भात, रोटी, भाज्या आणि देशी तूप असा संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थ टाळा.
3) संध्याकाळचा नाश्ता (सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत) हलका नाश्ता
संध्याकाळी हलका नाश्ता खाल्ल्याने रात्रीच्या जेवणापूर्वी जास्त भूक लागत नाही आणि पचन सुधारते. यावेळी फळे, भाजलेले मखाणे, सुकामेवा किंवा हर्बल टी घेणे फायदेशीर ठरते. शक्यतो पॅकेजिंग केलेले स्नॅक्स, खूप गोड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
४) रात्रीचे जेवण (सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत) हलके अन्नपदार्थ खा
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते, त्यामुळे रात्री उशिरा जड जेवण केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या जेवणात डाळ, हलक्या भाज्या, खिचडी किंवा सूप असे अन्नपदार्थ खावेत. जास्त मसालेदार, पचायला जड आणि फ्रिज मधील थंड अन्नपदार्थ खाऊ नयेत.
5) झोपण्यापूर्वी (रात्री ९ ते १० वाजेपर्यंत) तुम्ही काहीतरी हलके पिऊ शकता
झोपण्यापूर्वी जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर कोमट हळदीचे दूध, हर्बल टी किंवा कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…