महाराष्ट्र

पाचव्या प्रयत्नात यश; पाटणेच्या धनश्री अहिरेला यूपीएससीत ४८९ वा क्रमांक, आयपीएस पदावर झेप

मालेगाव: तालुक्यातील पाटणे येथील धनश्री जिभाऊ अहिरे हिने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदावर झेप घेतली आहे. पाचव्या प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.

धनश्रीचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण सटाणा येथील महाविद्यालयात घेत असताना तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुण्यात सुरुवातीची दोन वर्षे तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

धनश्रीने २०२१ मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतरच्या तीन प्रयत्नांमध्ये ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. अखेर २०२५ मध्ये दिलेल्या पाचव्या प्रयत्नात तिने देशात ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पद मिळवले. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतही ती यशस्वी झाली होती. चार महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालात तिची सहाय्यक वनसंरक्षक या पदासाठी निवड झाली होती.

धनश्रीच्या कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नाही. तिचे आई-वडील शेती करतात. बारावीपासूनच तिने आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आयपीएस अधिकारी भरत आंधळे आणि विश्वास नागरे-पाटील यांच्या कार्याची पुस्तके व व्हिडिओ पाहून तिला प्रेरणा मिळाली. बारावीनंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

धनश्री ही घरातील मोठी मुलगी असून तिची लहान बहीण अकरावीमध्ये तर भाऊ नववीमध्ये शिक्षण घेत आहे. मालेगावपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणे गावातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलगी आयपीएस अधिकारी झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, धनश्रीचे वडील जिभाऊ जगन्नाथ अहिरे हे शेतकरी असून त्यांनी शेती करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले. गावातील पहिली महिला आयपीएस अधिकारी ठरल्याने ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला.

धनश्री म्हणाली, “मी पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. दररोज आठ ते नऊ तास अभ्यास केला. निवडलेल्या क्षेत्रात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. आई-वडील आणि कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले. कोणताही क्लास न लावता यूपीएससी उत्तीर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago