स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो.
वात वाढल्यावर काय खावे
किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे.
वात प्रकृती असताना काय खाव
आहारात सहा रस मानले जातात- मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट, खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू, तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. कोकम सरबत नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियाची चटणी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यात मूग चांगला.
वात वाढल्यावर काय खाऊ नये
सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे, डुकराचे मांस हे वात दोषाची वाढ करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…