स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो.
वात वाढल्यावर काय खावे
किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे.
वात प्रकृती असताना काय खाव
आहारात सहा रस मानले जातात- मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट, खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू, तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. कोकम सरबत नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियाची चटणी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यात मूग चांगला.
वात वाढल्यावर काय खाऊ नये
सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे, डुकराचे मांस हे वात दोषाची वाढ करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…
शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…
मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…
मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…
मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…