आरोग्य

औषध घेतांना काय टाळाव

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून डॉक्टर रूग्णांना औषध वेळेवर घेण्या सोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधावरही प्रभाव पडत असतो.

केळी: आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळी मध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल, जसे की कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी तर केळी सहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.

आंबट फळ: जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.

चहा-कॉफी: औषधे ही गरम गोष्टी मुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्या सोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा मिळत नाही. अशात चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्था सोबत किंवा पेया सोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्या सोबत घ्यावीत.

डेअरी प्रॉडक्ट्स: डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ शरीरात काही एन्टीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीन सोबत काही रिएक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.

अल्कोहोल: अल्कोहोल सोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधात असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोल सोबत रिएक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्या ऐवजी जीवाला धोकाही होऊ शकतो.

कोल्ड ड्रिंक्स: सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स सोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध नुकसानकारक ठरू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

6 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

6 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

16 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

16 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

16 तास ago