आरोग्य

नैसर्गिकरित्या मूड बदलण्यासाठी काय करावं

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. मात्र हे करत असतांना याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि योग्य गोष्टींचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात. जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो.

उगवत्या सूर्याकडे बघा

उगवत्या सूर्याकडे बघितल्याने मूड बदलू शकतो. झाडांच्या पानांवर पडलेले सूर्य किरणे जे इंद्रधनुष्य निर्माण करतात. तसेच विविध रंगांच्या फुलांवरील सूर्य किरणे पहावी. सकाळी सकाळी होणारा पक्षांचा किलबिलाट ऐकावा. यावेळी नैसर्गिक उजेडात एक स्मित हास्य देऊन सेल्फी काढा. या नैसर्गिक वातावरणात तुमच्या मध्ये उच्च ऊर्जा निर्माण होईल. हा आवाज खूप साधा आहे, पण नेहमी साध्या गोष्टीच चांगला परिणाम करतात.

चालायला जा, धावा

धावायला जा. यावेळी सोबत पाण्याची बाटली, मास्क, ठेवा. पार्क मध्ये नैसर्गिक वातावरणात धावा. जेथे पक्षांचा किलबिलाट असेल. हिरवेगार वातावरण तुमच्या मध्ये हार्मोन बदल करतात.

लहान मुलांबरोबर खेळा

लहान मुलांचं हास्य निखळ असते. त्यांना मिठी मारणं, त्यांच्या सोबत खेळणं. यामुळे ऑक्सीटॉसिन नावाचे संप्रेरक निर्माण होते. जे मनावरील ताणाव दूर करते. यामुळे भावना चांगल्या व्यक्त होऊ लागतात.

आवडीचे काम करा

वेगवेगळ्या आवडी जसे पोहणे, वाचणे, खेळणे, चित्र काढणे, फोटोग्राफी यात निवांत वेळ घालवा, त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होईल. आवडीच्या गोष्टीत वेळ घालवण्याने तुम्ही आनंदी राहता. यामुळे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते.

योगासन करा

योगासांमुळे तणाव दूर होतो. याचा तुम्हाला दुहेरी फायदा होतो. एक तर तणाव दूर होतो आणि सकारात्मकता निर्माण होते.

अन्नातून सेरोटोनिन वाढवा

सेरोटोनिन या संप्रेरकांमुळे मूड चांगला होऊन आपण आनंदी राहतो. तुम्ही रोजच्या जीवनातून शरीराला सेरोटोनिन मिळवून देऊ शकता. यामध्ये बिया वर्गीय धान्य, प्रोटीन, मांसाहार तसेच इतर आहारातून सेरोटोनिन प्राप्त होते.

तेलाचा मसाज

काही तेलाचा मसाज करण्यासाठी वापर केल्याने देखील शरीराला शांती मिळण्यास मदत होते. यामुळे हार्मोन निर्माण होऊन मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. यासाठी लोह देणारे लिंबू वर्गीय फळ खाऊ शकता.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो. नैसर्गिक आणि साधी जीवन पद्धती एक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेव्हा केव्हा मानसिक स्थैर्य मिळवायचं असेल तर इतर पर्याया पेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि मनस्थितीला पुन्हा परत आणणे फायदेशीर ठरू शकते. केवळ आपणच स्वतःला आनंदी ठेवू शकतो, इतर कोणीही नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

9 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

9 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

11 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago