आरोग्य

कोणते गाजर चांगले लाल की नारंगी

हिवाळ्याच्या सुरुवातिपासून बाजारात लाल किंवा नारंगी गाजर दिसायला सुरूवात होते. गाजर फक्त चवीला उत्तम नसून तब्येतीच्या दृष्टीनंही चांगले असतात. पण अनेकदा कोणते गाजर खावेत, कोणते गाजर चांगले याबाबत लोक संभ्रमात असतात. दोन्ही प्रकारच्या गाजरांचे स्वत:चे वेगवेगळे गुणधर्म आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे ती आहारात महत्वाची ठरतात.

लाल गाजर

चव आणि पोषकतेच्या दृष्टीनं पाहिल्यात लाल गाजरं प्रामुख्यानं भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या गाजरांचा लाल रंग हा त्यातील लायकोपीन या घटकामुळे असतो. लायकोपीन हे एक शक्तीशाली एंटी ऑक्सिडेंट आहे जे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. लाल गाजरं चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यामुळेच ती हलवा, कोथिंबीर किंवा ज्यूस करण्यासाठी सर्वाधिक वापरली जातात.

नारंगी गाजरं

नारंगी गाजरं ही वर्षभर उपलब्ध असतात. या गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण ही गाजरं खातो तेव्हा आपले शरीर बीटा कॅरोटीनचे रुपांतर व्हिटामीन ए मध्ये करते हे जीवनसत्त्व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. नारंगी गाजरं चवीला थोडी कमी गोड असतात. पण ती सॅलेडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी उत्तम मानली जातात.

आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर दोन्ही गाजरं उत्कृष्ट ठरतात. जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर लाल गाजरांना पसंती द्यावी. तर डोळ्याचे आरोग्य किंवा व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढायची असेल तर नारंगी गाजरं खाणं फायदेशीर ठरतं.

निसर्गानं या दोन्ही भाज्यांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे भरलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाची निवड करण्यापेक्षा ऋतूप्रमाणे उपलब्ध असलेली दोन्ही प्रकारची गाजरं आहारात समाविष्ट करणं उत्तम ठरतं. थंडीच्या दिवसांत लाल गाजरांचा आनंद घ्या. इतर ऋतूंमध्ये नारंगी गाजरांचा वापर करून स्वत:ला निरोगी ठेवा. गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

12 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

12 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

12 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

12 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

12 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

12 तास ago