आरोग्य

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी

आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
लिंबू पाणी कुणासाठी घातक
संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू पाण्याचं अजिबात सेवन करू नये. त्याशिवाय ज्यांना हायपर ॲसिडिटी आणि पित्त दोष आहे अशा लोकांनी सुद्धा लिंबू, मध आणि गरम पाण्याचं सेवन करू नये. तसेच ज्या लोकांची हाडे कमजोर होतात, दात कमजोर असतात त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये. त्याशिवाय तोंडात फोड आले असेल किंवा अल्सर असेल तर त्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
गरम लिंबू पाणी कसं प्याल
जर वरच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी प्यायचंच असेल तर त्यांनी ते हलकं गरम करून प्यावं आणि थोडंच प्यावं. लिंबू पाण्यात मध चांगलं मिक्स करावं. पाणी फार जास्त गरम करू नये. मध कधीच पाण्यात गरम करू नये.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्याव
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.
किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे…

32 मिनिटे ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा ₹1500 हप्ता कधी मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या…

36 मिनिटे ago

ड्रग्सच्या शोधात पोलिसांचा छापा; २० पोत्यांत तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा सापडला!

पुणे : काकडेवस्ती परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या…

39 मिनिटे ago

‘१९ गुन्हे दाखल असलेला माणूस मंत्री कसा?’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर घणाघात

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर…

1 तास ago

अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर भांडूपच्या राजकारणात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज…

1 तास ago

चाकण MIDCला मोठा धक्का? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत

चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण…

1 तास ago