आरोग्य

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी

आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
लिंबू पाणी कुणासाठी घातक
संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू पाण्याचं अजिबात सेवन करू नये. त्याशिवाय ज्यांना हायपर ॲसिडिटी आणि पित्त दोष आहे अशा लोकांनी सुद्धा लिंबू, मध आणि गरम पाण्याचं सेवन करू नये. तसेच ज्या लोकांची हाडे कमजोर होतात, दात कमजोर असतात त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये. त्याशिवाय तोंडात फोड आले असेल किंवा अल्सर असेल तर त्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
गरम लिंबू पाणी कसं प्याल
जर वरच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी प्यायचंच असेल तर त्यांनी ते हलकं गरम करून प्यावं आणि थोडंच प्यावं. लिंबू पाण्यात मध चांगलं मिक्स करावं. पाणी फार जास्त गरम करू नये. मध कधीच पाण्यात गरम करू नये.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्याव
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.
किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शालेय शिक्षण विभाग राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग; लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग बनला असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची…

5 तास ago

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…

15 तास ago

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…

15 तास ago

संजय राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; खासदार ज्योती वाघमारे

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…

15 तास ago

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…

15 तास ago

शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…

20 तास ago