आरोग्य

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी

आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
लिंबू पाणी कुणासाठी घातक
संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू पाण्याचं अजिबात सेवन करू नये. त्याशिवाय ज्यांना हायपर ॲसिडिटी आणि पित्त दोष आहे अशा लोकांनी सुद्धा लिंबू, मध आणि गरम पाण्याचं सेवन करू नये. तसेच ज्या लोकांची हाडे कमजोर होतात, दात कमजोर असतात त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये. त्याशिवाय तोंडात फोड आले असेल किंवा अल्सर असेल तर त्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
गरम लिंबू पाणी कसं प्याल
जर वरच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी प्यायचंच असेल तर त्यांनी ते हलकं गरम करून प्यावं आणि थोडंच प्यावं. लिंबू पाण्यात मध चांगलं मिक्स करावं. पाणी फार जास्त गरम करू नये. मध कधीच पाण्यात गरम करू नये.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्याव
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.
किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

5 मिनिटे ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

8 मिनिटे ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

12 मिनिटे ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

16 मिनिटे ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

4 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

4 तास ago