आरोग्य

बाबा वेगांची ती अप्रिय भविष्यवाणी खरी ठरणार?

मुंबई: फ्रेंचचा प्रसिद्ध भविष्यवक्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस, भारताचे प्रसिद्ध भविष्यवक्ते संत अच्युतानंद दास आणि बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनी ती वाचली देखील आहे. मात्र फार कमी लोकांनी त्यातील एका भाकि‍ताकडे लक्ष दिलं असेल. या तीन भविष्यवेत्त्यांनीच नाही तर विदेशातील अनेक लोकांनी याबाबत भाकीत केलं आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही भविष्यवाणी?

कॉमन भविष्यवाणी

नोस्ट्राडेमस, संत अच्युतानंद दास आणि बाबा वेंगा या तीनही भविष्यवेत्त्यांनी एक सारखीच भविष्यवाणी केली आहे. या तीनही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार आकाशातून एक महाकाय उल्का पडेल, ज्यामुळे जगभरातील अनेक देश समुद्रात बुडतील. तिसरे महायुद्ध अटळ आहे, यातील बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार जगात एक मोठं युद्ध होईल, या युद्धानंतर चीन एक मोठी महासत्ता म्हणून जगासमोर येईल. मात्र या तीन्ही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेलं एक भाकीत आश्चर्यकारक आहे, त्यांनी भारतामध्ये एक महान नेता जन्म घेईल तो जग बदलेल असं देखील भाकीत वर्तवलं आहे.

संत अच्युतानंद दास यांनी देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे, ते श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते. अच्युतानंद दास यांनी केलेल्या भाकीतानुसार एक वेळ अशी येईल की जगात सर्व लोक हे श्रीकृष्णाचे भक्त बनतील, रशिया हे एक हिंदू राष्ट्र बनेल. रशियामधील शेकडो लोक भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी येतील. भारताचा राज्यकारभार एका संताच्या हाती येईल, तो अविवाहीत असेल, हा नेता पुढे जगभरात सनातन धर्माची स्थापना करेल असं भाकीत संत अच्युतानंद यांनी वर्तवलं आहे. असंच काहीस भाकीत बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी देखील वर्तवल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. मात्र तीनही भविष्यवेत्त्यांनी जगात तिसरं महायुद्ध होईल आणि यामध्ये जगातील अनेक देशांचं प्रचंड नुकसान होईल असं भाकीत वर्तवलेलं आहे. त्यामुळे यांची ही भविष्यवाणी आता जगासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

1 मिनिट ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

3 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

3 तास ago