ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा
मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे देशभरातील लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजीनामा घ्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, ई-२० धोरण २०३० पासून लागू होणे अपेक्षित होते, मात्र काही हितसंबंधीयांना लाभ मिळावा म्हणून ते घाईघाईत लागू करण्यात आले. पेट्रोलमध्ये इथेनॉलऐवजी पाणी मिसळल्याच्या तक्रारी समोर येत असून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला पाहिजे, असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत, त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप केला. आरएसएसचा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल हे त्याचाच भाग असल्याचेही सपकाळ म्हणाले.
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका…