मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेमागे भाजप आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, काँग्रेस गांधींचा अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तरी पोलिसांना त्याची माहिती नव्हती, यावर विश्वास बसत नाही. गांधी भवनला पोलीस सुरक्षा नसल्याबद्दल त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका, सभ्यता आणि संस्कृती सोडणार नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीचा उल्लेख करत, काँग्रेसने सभ्यता जपत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे काँग्रेसला सभ्यता शिकवू नये, असेही त्यांनी सुनावले. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर पूर्वी करण्यात आलेल्या टीकेचाही उल्लेख करत, त्यांनी आपल्या कार्यातूनच उत्तर दिल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…