महाराष्ट्र

मुंबईतील पाणी टँकर लॉबी कोणाची? काँग्रेसचा सवाल; ‘पाणी कपातीत टँकरला पाणी मिळते कुठून’

मुंबई: मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत असून, नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. मात्र, मुंबईत पाणी कपात सुरू असताना या टँकरना पाणी नेमके कुठून मिळते, टँकर लॉबीचे मालक कोण आहेत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

एखाद्या भागात विकास झालेला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचलेली नसेल किंवा पाण्याचे स्वतंत्र स्रोत उपलब्ध नसतील, तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे समजू शकते. मात्र, पाणीटंचाई आणि कपात असतानाही टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असेल, तर त्यामागे नेमकी यंत्रणा काय आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे लोंढे म्हणाले.‘या टँकर लॉबीचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक किंवा त्यांच्या जवळचे कंत्राटदार अथवा नातेवाईक या व्यवसायात आहेत का?’ असे प्रश्न उपस्थित करत लोंढे यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती मुंबईकरांसमोर आणण्याची मागणी केली.

सरकारकडून चौकशी होत नसली तरी किमान हे टँकर कोणाचे आहेत, त्यांना पाणी कुठून मिळते आणि टँकर मालकांचे स्थानिक राजकीय व्यक्तींशी काही संबंध आहेत का, याचा खुलासा झाला पाहिजे. मुंबईकरांना या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले.मुंबई महानगरपालिका प्रशासन, महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारने मुंबईतील टँकर लॉबीबाबत सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

10 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

14 तास ago