मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिली.
शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. उर्वरित किरकोळ कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १०.५ किमी लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून तो Maharashtra State Road Development Corporation ने साकारला आहे.
प्रकल्प सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे बायपास होऊन प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. अपघातांमध्येही मोठी घट होईल, असा दावा शिंदे यांनी केला. तसेच इंधन बचत आणि प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे एक्सप्रेसवेचे अंतर सुमारे ६ किमीने कमी होणार असून सुरुवातीला हलकी वाहने व बसांना प्राधान्य दिले जाणार आहे. टोलवाढीबाबत शिंदे यांनी स्पष्ट केले की, कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.
सुमारे ६७०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१९ मध्ये मंजूर झाला होता. या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली जोडणी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. “अशा प्रकल्पांमुळे केवळ रस्तेच नव्हे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते,” असे शिंदे यांनी सांगितले. पुढील काळात समृद्धी महामार्ग आणि इतर मोठ्या प्रकल्पांशी जोडून राज्यात मजबूत दळणवळण जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.”
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…