आरोग्य

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे, केस आणि शरीर या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तज्ज्ञ पाणी पिण्य़ाचा सल्ला देतात. पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ असते. पाणी पिताना आपल्याकडून बरेच नकळत चुका घडतात. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीरात सुमारे ६५ टक्के पाणी असते. हे प्रमाण वय, लिंग, उंची, वजन आणि शारीरिक हालचालीं नुसार बदलते. त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा.

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा

बहुतांश लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. परंतु याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकारही वाढतात. अन्न व्यवस्थित पचत नाही. अशावेळी पचन नीट न झाल्याने शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे मिळत नाही.

उभं राहून पाणी पिणे

वडीलधाऱ्यांनी आपल्याला उभं राहून पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी घातक असा सल्ला नक्कीच दिला असेल. यामुळे पचन क्रियेवर वाईट परिणाम होतोच पण नसांवरही ताण पडतो. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. यासोबतच किडनी आणि फुफ्फुसावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

एकाच वेळी भरपूर पाणी पिणे

उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्यक. परंतु, एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकते. एकाच वेळी पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते. ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ५७ कक्षांच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण

मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

5 तास ago

RSS-BJPची तिरंगा रॅली म्हणजे केवळ फोटोसेशन; इतिहास खोटे बोलत नाही; महेश तपासेंचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार…

5 तास ago

शिवसेना पक्षफुटी प्रकरणात सिब्बलांचा दोन सवालांनी शिंदे गटाची कोंडी?

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…

7 तास ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…

7 तास ago

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…

8 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…

8 तास ago