मुख्य बातम्या

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागातील विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे कमी व्होल्टेज, फेज जाणे आणि सतत वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम घरगुती वापरासोबतच दुकाने, दवाखाने, लिफ्ट, मोटारी आणि बाजारपेठेतील विविध उपकरणांवर होत आहे.उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या वापरामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असून विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयात लेखी निवेदन देत रोहित्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे आणि कमी व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.महावितरण प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनित बोरा, सागर चव्हाण, राजेंद्र लोळगे आणि अन्य नागरिकांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

11 मिनिटे ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

2 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

2 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

15 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

15 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

15 तास ago