शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागातील विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे कमी व्होल्टेज, फेज जाणे आणि सतत वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम घरगुती वापरासोबतच दुकाने, दवाखाने, लिफ्ट, मोटारी आणि बाजारपेठेतील विविध उपकरणांवर होत आहे.उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या वापरामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असून विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयात लेखी निवेदन देत रोहित्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे आणि कमी व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.महावितरण प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनित बोरा, सागर चव्हाण, राजेंद्र लोळगे आणि अन्य नागरिकांनी दिला आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…
शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…
मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…