मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी (४ मे) महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानभवन येथे त्यांना अधिकृत निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल रोजी डॉ. गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननीनंतर इतर अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्याने नऊ जागांसाठी नऊ उमेदवार अशी स्थिती निर्माण झाली आणि निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, महिला सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण, विकासकामांना गती देणे आणि विधिमंडळातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे यावर आपला भर राहणार आहे. महायुतीतील सहकार्य तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.या प्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…