मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या ठिकाणी बिहारमधील Mahabodhi Temple संकुलाच्या धर्तीवर भव्य ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे Sanjay Shirsat यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला Anandraj Ambedkar यांच्यासह संबंधित पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेनंतर सर्वानुमते या जागेचा समाजहितासाठी विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, Dr. Shrikant Shinde यांनी या जागेच्या सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून येथे जागतिक दर्जाचे बौद्ध संकुल उभारण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सुमारे ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, ध्यान केंद्र आणि अत्याधुनिक विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे.
हे संकुल केवळ धार्मिक केंद्र न राहता ज्ञान, संस्कृती आणि संशोधनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय, आधुनिक ग्रंथालय, बौद्ध सांस्कृतिक संग्रहालय, डिजिटल रिसर्च सेंटर, अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश असेल.
या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री शिरसाट यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे लवकरच जागेची पाहणी करणार असून, त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.या निर्णयामुळे बुद्धभूमीच्या जागेसंदर्भातील वादावर कायमचा पडदा पडण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सामाजिक ऐक्य, प्रज्ञा, करुणा आणि बंधुतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…