मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते Jayant Patil यांनी केली आहे.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात हजारो हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक एका रात्रीत मातीमोल झाली आहे.
केळी हे नगदी पीक असून रोपे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यासाठी हेक्टरी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे त्यांनी नमूद केले.
शासनाने नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पारदर्शक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच बँक कर्जवसुलीला स्थगिती देऊन व्याजमाफीचा विचार करावा आणि विमा कंपन्यांना त्वरित विमा दावे मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार मदतीचे जे निकष निश्चित करण्यात आले होते त्यांची मुदत २०२५-२६ पर्यंतच होती. त्यामुळे सद्यस्थितीत हे निकष तात्काळ सुधारित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…