मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नागपुरात नवा वाद निर्माण झाला आहे. “सावजी जेवण माझ्यासारख्या माणसाने खाल्ले तर किमान महिना भर रुग्णालयात जावे लागेल” तसेच “अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो” असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यावर सावजी हॉटेल चालक आणि सावजी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागपुरातील सावजी हॉटेल चालकांचे म्हणणे आहे की, सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नसून नागपूरची ओळख आणि परंपरा आहे. शहरात सुमारे हजार सावजी भोजनालये असून दररोज हजारो नागरिक येथे जेवतात. “सावजी आरोग्यासाठी घातक असते, तर नागपुरातील रुग्णालये रुग्णांनी भरली असती,” असा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.
काही हॉटेल चालकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर प्रसिद्धीसाठी अशी विधाने केल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांनी मुंढेंना मूळ पारंपरिक पद्धतीने तयार केलेले सावजी जेवण चाखण्याचेही निमंत्रण दिले आहे.
दरम्यान, सावजी समाजाने मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सावजी ब्रँड आणि या व्यवसायाशी संबंधित समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे.
दुसरीकडे, काही जणांनी मुंढे यांच्या निरीक्षणात काही तथ्य असल्याचेही म्हटले आहे. सावजीच्या नावाखाली अनेक ठिकाणी अतिप्रमाणात तेल आणि तिखट वापरले जात असल्याने मूळ चव आणि गुणवत्ता बिघडत असल्याची टीका केली जात आहे.
आहारतज्ज्ञ स्नेहा झावर यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सावजी मसाल्यातील मसाले आरोग्यासाठी लाभदायक असले तरी तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने तयार केलेले सावजी पदार्थ आरोग्यदायी ठरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावजी खाद्यसंस्कृती ही मध्य भारतातील हलबा-कोष्टी समाजाची पारंपरिक देणगी मानली जाते. खास मसाला, भाजण्याची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे सावजी मटण, चिकन, खिमा, कलेजी, तर्री पोहे आणि अनेक शाकाहारी पदार्थांना देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे.
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…