महाराष्ट्र

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 92.09 टक्के, मुलींची बाजी

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची सरशी

दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी पुन्हा एकदा उजवी ठरली आहे.

मुलांचा निकाल : 89.56 टक्के

मुलींचा निकाल : 94.96 टक्के

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 टक्क्यांनी अधिक राहिली.

कोकण विभाग अव्वल

राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून तो 97.62 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के नोंदवण्यात आला.

इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे :

कोल्हापूर – 95.47 टक्के

मुंबई – 94.97 टक्के

पुणे – 94.24 टक्के

नाशिक – 90.53 टक्के

अमरावती – 90.50 टक्के

नागपूर – 89.07 टक्के

लातूर – 88.42 टक्के

श्रेणीनिहाय निकाल

प्राविण्यासह प्रथम श्रेणी – 27.41 टक्के

प्रथम श्रेणी – 31.26 टक्के

द्वितीय श्रेणी – 24.66 टक्के

उत्तीर्ण श्रेणी – 8.75 टक्के

‘एका परीक्षेवर आयुष्य ठरत नाही’

मंत्री दादाजी भुसे यांनी अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना धीर देताना, “एका परीक्षेचा निकाल तुमची बुद्धिमत्ता किंवा संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे,” असा संदेश दिला. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

गुणसुधार योजनेत तीन संधी

दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत पुढील तीन परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी मिळणार आहे. जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 या परीक्षांमध्ये विद्यार्थी गुणसुधारासाठी अर्ज करू शकणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

8 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

12 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

12 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

12 तास ago

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

12 तास ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

12 तास ago