मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
योजना काय आहे
महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल.
प्रथम वर्षी 7000 रुपये (महिन्याला)
दुसऱ्या वर्षी 6000 रुपये
तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल.
विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळेल.
कोणाला करता येणार अर्ज
अर्ज करण्यासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक.
18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे.
योजनेचा फायदा:
1) प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील.
2) स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगली करियर संधी मिळेल.
3) आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता साधता येईल.
4) विमा क्षेत्रातील अनुभवामुळे उद्योगातील मोठ्या संधी मिळवता येतील.
आवश्यक अटी:
किमान शैक्षणिक अटी: 10 वी पास
वयाची अट: 18 ते 70 वर्षे.
महिलांसाठीच योजना.
महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता मिळवून देणारी *विमा सखी योजना* आपल्याला सक्षम बनवेल. अर्ज करा आणि आपला करिअर सुरू करा.
मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…