मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
योजना काय आहे
महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल.
प्रथम वर्षी 7000 रुपये (महिन्याला)
दुसऱ्या वर्षी 6000 रुपये
तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल.
विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळेल.
कोणाला करता येणार अर्ज
अर्ज करण्यासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक.
18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे.
योजनेचा फायदा:
1) प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील.
2) स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगली करियर संधी मिळेल.
3) आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता साधता येईल.
4) विमा क्षेत्रातील अनुभवामुळे उद्योगातील मोठ्या संधी मिळवता येतील.
आवश्यक अटी:
किमान शैक्षणिक अटी: 10 वी पास
वयाची अट: 18 ते 70 वर्षे.
महिलांसाठीच योजना.
महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता मिळवून देणारी *विमा सखी योजना* आपल्याला सक्षम बनवेल. अर्ज करा आणि आपला करिअर सुरू करा.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…