मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेमागे भाजप आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, काँग्रेस गांधींचा अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तरी पोलिसांना त्याची माहिती नव्हती, यावर विश्वास बसत नाही. गांधी भवनला पोलीस सुरक्षा नसल्याबद्दल त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका, सभ्यता आणि संस्कृती सोडणार नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीचा उल्लेख करत, काँग्रेसने सभ्यता जपत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे काँग्रेसला सभ्यता शिकवू नये, असेही त्यांनी सुनावले. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर पूर्वी करण्यात आलेल्या टीकेचाही उल्लेख करत, त्यांनी आपल्या कार्यातूनच उत्तर दिल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…