संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर मोठा अनर्थ घडला. जवळपास 600 जणांना विषबाधा झाली असून, 8 वर्षांच्या सुरेश मधे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
17 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच करंजखेड व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम
शुक्रवार दुपारी ४:३० वाजता आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या आणि 32 ठाकरवाड्यांमधून आलेल्या पाहुण्यांनी जेवण केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीची तक्रार झाली.
आरोग्य व पोलिस यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.
सध्याची परिस्थिती
काही रुग्ण करंजखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गंभीर रुग्णांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…