संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर मोठा अनर्थ घडला. जवळपास 600 जणांना विषबाधा झाली असून, 8 वर्षांच्या सुरेश मधे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
17 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच करंजखेड व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम
शुक्रवार दुपारी ४:३० वाजता आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या आणि 32 ठाकरवाड्यांमधून आलेल्या पाहुण्यांनी जेवण केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीची तक्रार झाली.
आरोग्य व पोलिस यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.
सध्याची परिस्थिती
काही रुग्ण करंजखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गंभीर रुग्णांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…