संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर मोठा अनर्थ घडला. जवळपास 600 जणांना विषबाधा झाली असून, 8 वर्षांच्या सुरेश मधे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
17 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच करंजखेड व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम
शुक्रवार दुपारी ४:३० वाजता आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या आणि 32 ठाकरवाड्यांमधून आलेल्या पाहुण्यांनी जेवण केले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीची तक्रार झाली.
आरोग्य व पोलिस यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अन्न व औषध प्रशासन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.
सध्याची परिस्थिती
काही रुग्ण करंजखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गंभीर रुग्णांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…