महाराष्ट्र

हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

मुंबई: संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी केला.

पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहारा विरोधात भारतीय जनता पार्टीच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. शेलार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठ चे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मिरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने यावेळी करण्यात आली.

यावेळी ॲड. शेलार म्हणाले की ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निर्घृण अत्याचाराविरोधात भाजपा उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो अस म्हणतात पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात असा खरमरीत सवाल ही यावेळी ॲड. शेलार यांनी केला. हिंदू एकजूट होताना दिसले की लगेच जाती भेद निर्माण करून वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ही सामील आहेत असे म्हणत ॲड. शेलार यांनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यावर नाव न घेता शरसंधान केले. पहलगाम हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना मोदी सरकार कडक शासन देईल यात शंकाच नाही असेही त्यांनी नमूद केले.

प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी शनिवारी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आली. यावेळी ‘ममता सरकार मुर्दाबाद’, ‘ममता राजीनामा दो’, राष्ट्रपती शासन लागू करो अशा घोषणा देत नराधम ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मुर्शिदाबाद येथील हिंसाचारात आणि पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

13 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

17 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

17 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

17 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

18 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

18 तास ago