महाराष्ट्र

हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

मुंबई: संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी केला.

पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहारा विरोधात भारतीय जनता पार्टीच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. शेलार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठ चे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मिरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने यावेळी करण्यात आली.

यावेळी ॲड. शेलार म्हणाले की ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निर्घृण अत्याचाराविरोधात भाजपा उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो अस म्हणतात पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात असा खरमरीत सवाल ही यावेळी ॲड. शेलार यांनी केला. हिंदू एकजूट होताना दिसले की लगेच जाती भेद निर्माण करून वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ही सामील आहेत असे म्हणत ॲड. शेलार यांनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यावर नाव न घेता शरसंधान केले. पहलगाम हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना मोदी सरकार कडक शासन देईल यात शंकाच नाही असेही त्यांनी नमूद केले.

प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी शनिवारी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आली. यावेळी ‘ममता सरकार मुर्दाबाद’, ‘ममता राजीनामा दो’, राष्ट्रपती शासन लागू करो अशा घोषणा देत नराधम ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मुर्शिदाबाद येथील हिंसाचारात आणि पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

13 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

17 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

17 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

17 तास ago