मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.त्यांनी पुढे नमूद केले की, आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.
आशाताई भोसले यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित होऊन देशाचा गौरव वाढवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कला क्षेत्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी आशा भोसले यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…