महाराष्ट्र

भारतीय संगीतविश्वातील जादुई आवाज हरपला

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.त्यांनी पुढे नमूद केले की, आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.

आशाताई भोसले यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित होऊन देशाचा गौरव वाढवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कला क्षेत्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे.  या दुःखद प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी आशा भोसले यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

13 तास ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

13 तास ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

13 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…

13 तास ago

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…

14 तास ago

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…

14 तास ago