महाराष्ट्र

सावकारांचे रॅकेट; प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम लावून तपास केला पाहिजे

राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे, महायुती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे

नागपूर: चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले.त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे याची कंबोडिया मध्ये किडनी विकल्यावर तो व्हिएनतियान इथल्या कॉल सेंटर मध्ये काम करत होता.तिथे त्याला मारहाण होऊन पासपोर्ट काढून घेतला होता.जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला सुरक्षित भारतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आणले. या प्रकरणात पाच वेळा चंद्रपूर पोलिस अधीक्षक यांना फोन करून कारवाईची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे रॅकेट आहे. विदर्भ आणि मरावाड्यात जिल्हा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली हे सरकार शेतकऱ्यांना उद्भवत करणारे आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सक्रिय असू शकतं. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे,जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात आज नगरपरिषदेचे मतदान होत असले तरी अनेक ठिकाणी पैशाचे आमिष मतदारांना दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणूक आयोग हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. घुघुग्स निवडणुकीत पाच हजार रुपयाची पाकीट वाटण्यात आली तर त्र्यंबकेश्वर येथील निवडणुकीत ५० हजार रुपये एका मताला देण्यात आले कारण कुंभ येत आहे तिथे सत्ता हवी आहे. हे सगळ होत असताना निवडणूक आयोग झोपून आहे,काहीही कारवाई करत नाही म्हणून आयोग भाजपची बी टीम असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.

भाजपला उद्याच्या निवडणूक निकालात यश मिळेल असा आत्मविश्वास हा बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावरच आहे, अस वडेट्टीवार म्हणाले. सदोष मतदार यादी असून याबाबत वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग काहीही करत नाही. भाजपने निकालाची वाट न बघता गुलाल उधळला पाहिजे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

12 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

17 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

17 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

17 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

17 तास ago