महाराष्ट्र

सावकारांचे रॅकेट; प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम लावून तपास केला पाहिजे

राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे, महायुती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे

नागपूर: चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले.त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे याची कंबोडिया मध्ये किडनी विकल्यावर तो व्हिएनतियान इथल्या कॉल सेंटर मध्ये काम करत होता.तिथे त्याला मारहाण होऊन पासपोर्ट काढून घेतला होता.जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला सुरक्षित भारतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आणले. या प्रकरणात पाच वेळा चंद्रपूर पोलिस अधीक्षक यांना फोन करून कारवाईची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे रॅकेट आहे. विदर्भ आणि मरावाड्यात जिल्हा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली हे सरकार शेतकऱ्यांना उद्भवत करणारे आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सक्रिय असू शकतं. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे,जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात आज नगरपरिषदेचे मतदान होत असले तरी अनेक ठिकाणी पैशाचे आमिष मतदारांना दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणूक आयोग हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. घुघुग्स निवडणुकीत पाच हजार रुपयाची पाकीट वाटण्यात आली तर त्र्यंबकेश्वर येथील निवडणुकीत ५० हजार रुपये एका मताला देण्यात आले कारण कुंभ येत आहे तिथे सत्ता हवी आहे. हे सगळ होत असताना निवडणूक आयोग झोपून आहे,काहीही कारवाई करत नाही म्हणून आयोग भाजपची बी टीम असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.

भाजपला उद्याच्या निवडणूक निकालात यश मिळेल असा आत्मविश्वास हा बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावरच आहे, अस वडेट्टीवार म्हणाले. सदोष मतदार यादी असून याबाबत वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग काहीही करत नाही. भाजपने निकालाची वाट न बघता गुलाल उधळला पाहिजे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

17 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

17 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

17 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

19 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago