आरोग्य

कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की पिकलेल.

 

पिकलेल्या केळ्याचे फायदे

 

पिकलेल्या केळ्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो, म्हणजेच ते शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं. पचनासाठी पिकलेलं केळं हलकं आणि सोपं असतं. त्यामुळे लहान मुलं आणि खेळाडूंसाठी पिकलेलं केळं आदर्श मानलं जातं.

 

कच्च्या केळ्याचे फायदे

 

कच्च्या केळ्यात रेझिस्टंट स्टार्च असतो. हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. जो पचनाची प्रक्रिया स्लो करतो आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनसंस्थेसाठी चांगलं असतं. डायबिटीस किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या लोकांसाठी कच्चं केळं अधिक फायदेशीर ठरतं.

 

वजन कमी करण्यासाठी कोणतं केळं योग्य

 

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी कच्चं केळं सर्वोत्तम पर्याय आहे. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणं टाळता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

 

कच्चं की पिकलेलं – कोणते चांगले

 

दोन्ही प्रकारची केळी आपल्या-आपल्या फायद्यांसाठी उपयोगी आहेत. पिकलेले केळं ऊर्जेसाठी उत्तम, तर कच्चं केळं पचन आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी उत्तम.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago