आरोग्य

कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की पिकलेल.

 

पिकलेल्या केळ्याचे फायदे

 

पिकलेल्या केळ्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो, म्हणजेच ते शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं. पचनासाठी पिकलेलं केळं हलकं आणि सोपं असतं. त्यामुळे लहान मुलं आणि खेळाडूंसाठी पिकलेलं केळं आदर्श मानलं जातं.

 

कच्च्या केळ्याचे फायदे

 

कच्च्या केळ्यात रेझिस्टंट स्टार्च असतो. हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. जो पचनाची प्रक्रिया स्लो करतो आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनसंस्थेसाठी चांगलं असतं. डायबिटीस किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या लोकांसाठी कच्चं केळं अधिक फायदेशीर ठरतं.

 

वजन कमी करण्यासाठी कोणतं केळं योग्य

 

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी कच्चं केळं सर्वोत्तम पर्याय आहे. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणं टाळता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

 

कच्चं की पिकलेलं – कोणते चांगले

 

दोन्ही प्रकारची केळी आपल्या-आपल्या फायद्यांसाठी उपयोगी आहेत. पिकलेले केळं ऊर्जेसाठी उत्तम, तर कच्चं केळं पचन आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी उत्तम.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

19 मिनिटे ago

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

18 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

19 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

19 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

22 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

23 तास ago