महाराष्ट्र

मतदानादरम्यान धक्कादायक प्रकार! उमेदवाराच्या लहान मुलाने दाबले ईव्हीएमचे बटण

अकलूज: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक अनोखी आणि चर्चेची घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने थेट ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मतदान केंद्रावर गोंधळ

घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. केंद्राध्यक्षांनी तत्काळ हस्तक्षेप करत नियमांचा उल्लेख केला. लहान मुलांना मतदान केंद्रात प्रवेश देणे आणि मतदान प्रक्रियेत सहभागी करणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुलाने स्वतः बटण दाबल्याचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपला मुलगा रुद्रराज मोहिते पाटील याला मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यासाठी केंद्रात घेऊन आले होते. ईव्हीएमसमोर प्रक्रिया समजावून सांगत असतानाच मुलाने स्वतः बटण दाबले.

उमेदवाराची भूमिका

या घटनेवर प्रतिक्रिया देताना अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, मुलाला लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देण्याचा त्यांचा उद्देश होता. आई-वडिलांचे मतदान प्रत्यक्ष पाहता यावे, एवढाच हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी यावर फारसा आक्षेप घेतला नसल्याचाही त्यांनी दावा केला.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

अकलूजमधील ही घटना अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, विविध स्तरांतून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्यभरात मतदान उत्साहात सुरू असताना ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे.

९ फेब्रुवारीला मतमोजणी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) मतदान होत आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे.या निवडणुकीत ७३१ जिल्हा परिषद गट आणि १,४६२ पंचायत समिती गणांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार रिंगणात आहेत.मतदानानंतर सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील आचारसंहिता संपुष्टात येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

6 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

8 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

8 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

8 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

8 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

8 तास ago