महाराष्ट्र

महापौर-उपमहापौर निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या उमेदवारीने ‘ट्विस्ट’

पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार भाजपकडून महापौर पदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षानेही महापालिकेत विरोधी भूमिका कायम ठेवत महापौर पदासाठी अश्विनी लांडगे, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांना उमेदवारी दिली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या नावांची घोषणा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही, याबाबत मंगळवारी सकाळपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला मत,” असे विधान करत टीका केली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्या. गटनेते अ‍ॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि आमदार चेतन तुपे यांच्यात बैठक झाली. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल सावंत, तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांची नावे निश्चित करण्यात आली. सावंत आणि बहिरट यांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरुवातीला ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल, असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नाट्यमय निर्णयामुळे ही निवडणूक आता तिरंगी लढतीत रूपांतरित झाली आहे.

राष्ट्रवादी लढणार की माघार घेणार?

महापौर व उपमहापौर पदासाठीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (ता. ९) होणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

20 तास ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

24 तास ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

2 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

2 दिवस ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

2 दिवस ago