महाराष्ट्र

महापौर-उपमहापौर निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या उमेदवारीने ‘ट्विस्ट’

पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार भाजपकडून महापौर पदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षानेही महापालिकेत विरोधी भूमिका कायम ठेवत महापौर पदासाठी अश्विनी लांडगे, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांना उमेदवारी दिली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या नावांची घोषणा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही, याबाबत मंगळवारी सकाळपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला मत,” असे विधान करत टीका केली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्या. गटनेते अ‍ॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि आमदार चेतन तुपे यांच्यात बैठक झाली. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल सावंत, तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांची नावे निश्चित करण्यात आली. सावंत आणि बहिरट यांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरुवातीला ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल, असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नाट्यमय निर्णयामुळे ही निवडणूक आता तिरंगी लढतीत रूपांतरित झाली आहे.

राष्ट्रवादी लढणार की माघार घेणार?

महापौर व उपमहापौर पदासाठीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (ता. ९) होणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

3 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

5 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

11 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

19 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago